अधुरी प्रेम कहाणी- भाग २

Love Stories

अमन रीता शुद्धिवर येण्याची वाट पाहत होता, ती लवकरच बरी होणार अशी त्याला खात्री होती. कितीही खर्च आला तरी चालेल, काहीही करून रीताला बरं करायचे अशी त्याची धडपड सुरू होती. डॉक्टर सुद्धा शक्य ते प्रयत्न करत होते. अमनचा त्याच्या प्रेमावर विश्वास होता पण नियतीच्या मनात नेमके काही वेगळेच होते. दोन आठवडे होत आले , उपचार सुरू होते पण रीताच्या प्रक्रुतीत हवी तशी सुधारणा होत नव्हती. रीताच्या अंगात बर्‍याच दिवसांपासून ताप होता, त्यामुळे तिची अवस्था अशी झाली असा अंदाज विविध तपासण्या करून डॉक्टरांनी सांगितला. रीताने स्वत: कडे इतके कशे दुर्लक्ष केले, आपल्याही लक्षात कशे आले नसेल हा विचार करत अमन दररोज रिताला बघत बसायचा, तिची शुद्धीवर येण्याची वाट पाहत असायचा.एक दिवस अचानक रीताने या जगाचा निरोप घेतला, अमनच्या पायाखालची जमीन सरकली, रीता आपल्याला अशी सोडून जाऊ शकत नाही हीच गोष्ट त्याच्या मनात होती पण नियतीने तिला अमन पासून वेगळे केले. अमन खूप खचला, इतके मोठे दुःख आयुष्यात कधी येयील असा त्याने कधीच विचार केला नव्हता.

यातून बाहेर पडणे त्याला सोपे नव्हते, अमनला रीताच्या आणि त्याच्या आई वडिलांनी खूप समजून घेतले. तेही तितकेच खचले होते पण अमनचं अख्खं आयुष्य पुढे आहे, ते सुखी करण्यासाठी शक्य ते प्रयत्न सगळे करत होते. 

अमनची आई त्याला सतत म्हणायची की रीता चे तुझ्यावर खूप प्रेम होते, ती या जगात नसली तरी तू नेहमी आनंदी असावा हीच रीताची सतत धडपड होती, तू असा खचून जाऊ नकोस, नव्या आयुष्याची सुरुवात कर. रीता ची साथ इथपर्यंतच होती, नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही, अमन तू स्वत:ला सावर. 

हळूहळू वेळ गेला तसं अमनने सत्य स्विकारलं, रीता शिवाय आयुष्य कठीण असले तरी ते मान्य करावे लागणार हे त्याला जाणवले होते.

दोन वर्षांनी अमनच्या घरच्यांनी त्याला ओळखीतल्या एका मुलीचे स्थळ सांगितले, मीनल असे तिचे नाव अतिशय साधी सरळ मुलगी. अमनच्या मनात रीताची जागा दुसरं कुणी घेऊ शकत नाही याची जाणीव अमनला होती, तिच्या गोड आठवणी त्याने मनात जपलेल्या होत्या. नविन आयुष्याची सुरुवात करताना आधी मीनलला रीता बद्दल सगळं सांगायचे अशे अमनने ठरवले. मीनलला रीता विषयी सगळं आधीच कळाले होते ,तीने अमनला समजून घेतले, मी रीता ची जागा घेऊ शकत नसली तरी नेहमी तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेल, मला खरंच आवडेल तुझ्या सोबत आयुष्य घालवायला, एवढेच मीनल बोलली. अमनला तिच्या बोलण्यात एक निरागस भाव जाणवला. पुढचं आयुष्य मीनल सोबत घालवण्याचा त्याने निर्णय घेतला. रीता पहिलं प्रेम,ती मनात सदैव असेल, तिच्यासोबतची प्रेम कहाणी अधुरी असली तरी तिच्या गोड आठवणी अमर आहेत.

मीनलचा प्रेमळ सहवास , तिचा समजुतदारपणामुळे वेळेनुसार अमन मीनल मध्ये गुंतला, तिने आपल्याला खूप समजून घेतले, आपण कधीच मीनलला दुखवायचे नाही हे अमनने मनोमन ठरवले आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात केली.

– अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed