ADHD- पाल्यांमधील एक समस्या

Parenting

एखादी स्त्री जेव्हा आई होते, त्यानंतर बाळाशी निगडित बर्‍याच विषयावर आईचे वाचन, संशोधन सुरू होते. अशातच माझ्या वाचनातून गेलेला एक विषय म्हणजे “ADHD- Attention Deficit Hyperactivity Disorder”.
ADHD नक्की काय आहे हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.
ही एक अशी स्थिती आहे ज्यात मुलांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरा सुरू करणे, गोष्टी लगेच विसरून जाणे, Hyperactive असणे , Restless होणे अशातच कुणी समजून घेत नसेल तर आक्रमक, नकारात्मक होणे ही लक्षणे दिसून येतात. ही स्थिती साधारणतः बालपणापात सुरू होऊन किशोर वयातपर्यंत  दिसून येते. बालक असताना सगळी मुले आजुबाजूच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, मस्ती करतात, एकाग्र नसतात पण जसजसे मुलं मोठी होतात तसं हे सगळं कमी होऊ लागते. काही मुलांमध्ये मात्र अती चंचलता, एकाग्रतेची कमी वयानुसार वाढत जाते. काहींना अभ्यासात रस नसतो पण खेळण्याची अथवा इतर कुठल्या गोष्टीची आवड असते. अशा वेळी काळजीचं कारण नाही पण कुठल्याच गोष्टीत मन रमत नसेल तर ADHD ची लक्षणे असू शकतात तेव्हा त्यानूसार काळजी घेणे गरजेचे असते. ही एक मानसिक स्थिती असते, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांव्दारे काऊन्सलिंग करून घेतले तर मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते.

ADHD होण्याची कारणे-

१. आनुवंशिकता
२. पर्यावरण – गर्भावस्थेत आई अल्कोहोल प्राशन करत असेल तर fetal alcohol spectrum disorders होऊन मुलांमध्ये ADHD ची लक्षणे दिसून येतात.
३. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास – मुलांचा विकास नीट झाला नसेल तरी ही लक्षणे दिसून येतात.

काही पाल्य अतिशय चंचल आहे, अभ्यासात किंवा कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रीत करु शकत नाही, रांगेत उभं राहिल्यावर आपला नंबर येईपर्यंत थांबत नाही, अशी लक्षणं सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलांमध्ये पाहायला मिळतात. पण ही लक्षणं जास्त प्रमाणात आढळल्यास चिंतेची बाब ठरु शकते. असा स्वभाव असल्याने पाल्यांना शिक्षकांकडून तसेच पालकांकडून चुकीच्या अथवा असंवेदनशील वर्तणुकीला सामोरे जावे लागते. मुलं चंचल आहे, आपलं ऐकत नाही, वर्गात लक्ष नाही म्हणून सतत रागवले कि मुलांमधील चिडखोरपणा, आक्रमकता जास्त प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मुलांना काऊन्सेलिंग द्वारे कंट्रोल करता येते, म्हणूनच २०१७ मध्ये शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत’काऊन्सलिंग सेल’असणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं.
मुलं अती प्रमाणात चंचल असतील, एकाग्रता नसेल तर अशा मुलांना प्रेमाने समजून सांगणे खूप गरजेचे आहे. पालकांना अशा परिस्थितीत खूप त्रास होतो पण चिडचिड न करता योग्य वेळ देऊन मुलांना समजून सांगणे, त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये त्यांना एकाग्र व्हायला मदत करणे खूप आवश्यक आहे, त्यात आई मुलांना सगळ्यात जवळची असल्याने आईने मुलांना समजून घेणे, प्रेमाने हाताळणे महत्वाचे असते, सोबतच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काऊन्सलिंग करून घेणे फायदेशीर ठरते.

याविषयी अधिक माहिती असल्यास नक्की शेअर करा.

  • अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed